Thursday, August 8, 2019

कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरुच


कोकणाबरोबर कोल्हापूरमध्येही माजी खासदार निलेश राणेजींचे मदतकार्य सुरु.
    
कोकण म्हटले कि,अखंड राणे कुटुंबच नेते म्हणून ओळखले जातात.माजी मुख्यमंत्री खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष 

 मा.नारायण अर्थात दादासाहेब राणे नाव हे त्यांच्या स्वभावामुळे आणि कामकाजामुळे ओळखले जाते.त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रात कुठेही

असो, मदत हि केलेली आहे .त्यांचा वारसा त्यांची मुले चालवत आहेत.कोणाला दवाखान्याची मदत असो कि कोणतीही कोकणात मदतीसाठी आणि त्यांच्या जनहितार्थ आक्रमक रित्या जनतेच्या प्रश्नांसाठी रस्यावर स्वत: उतरणे आणि न्याय मिळवायचा या साठी ते नेहमीच चर्चेत असतात.आज सकाळी आमदार मा.नितेश नारायणराव राणे यांच्या कडून ५००० लिटर दुधाचे मोफत वाटप केले आणि आता तर अजून कोणतीही मदत असो त्यासाठी तप्तर आहोत असे सांगण्यात येते .
      या अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य तो निचरा न झाल्यामुळे हाहाकार माजला आहे.माजी खासदार निलेशजी राणे यांच्या कडून कोल्हापूरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमध्ये मदत केल्याबद्दल महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुकाचे ट्वीट करण्यात आले त्याच प्रमाणे जनतेला कोणत्याही मदतीची गरज असल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपल्या मदतीसाठी तयार आहे,ज्यांना मदत हवीय त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.सचिन तोडकर (९०९६८०७८८८ ) यांना संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.माजी खासदार निलेशजी राणे हे सुद्धा आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्व,स्पष्ट वक्तेपणा आणि जनहितार्थ आक्रमक स्वभावामुळे पूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत.अनेक बंद झालेल्या कंपनीच्या  कर्मचारी ह्यांना सहाय्य करणे त्यांच्या हक्कासाठी आक्रमक पावित्रा घेणे,मदत कोणालाही आणि कुठेही असो मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी  असला तरी चालेल पण मदत हि करायचीच अशा अनेक कारणामुळे ज्यांना ओळखले जाते.कोकणातच नव्हे तर कुठेही, हे राणे कुटुंबीय नेहमीच मदती साठी आणि लोकांच्या मागण्यासाठी आक्रमक रहाण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
आपण जनतेच्या सेवेसाठी जन्म घेतला आम्ही या मातीचे कायतरी देण पडतो ,जनतेच्या हितार्थ कोणतीही भूमिका स्विकारणे हेच आमचे कर्तव्य आहे असे त्यांच्या बोलण्यातूनहि आणि वागण्यातूनहि  दिसून येते.
     माजी खासदार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.निलेशजी राणे यांचे ट्वीट.....







No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...