Saturday, August 3, 2019

सावधान भारत : सह्याद्री नाऊ (स्वराज्य माझ्या शिवबांचे पण आज)



खरच एक वास्तविक असा काव्यमय लेख - स्वराज्य माझ्या शिवबांचे पण आज (थोडक्यात )


एवढा सर्व असताना तुम्ही विसरलात का?
अन्यायाविरुद्ध स्वराज्य निर्माण केले शिवरायांनी ,
शे-पाचशे मावळ्यांनी लाखोंना धूर चारली ,
आणि स्वराज्याची आपल्या निर्मिती केली.
स्त्री हि एकटी असलीची  जबाबदारी शिकविली ,
अत्याचारावर “चौरंग ” हि शिक्षा पण केली.
अन्यायाविरुद्ध बंड करण्यास शिकविला.
स्वराज्यासाठी एकत्र येण्यास शिकवण दिली.
स्वराज्याशी गद्धारी करणाऱ्यांना पायदळी दिला.
माती आपली एकच आणि आपले रक्तही म्हणून
अठरापगड जातींना त्यांनी समानता हि दिली .
अन्यायकारक राज्यकर्त्याला त्यांनी शिक्षाही दिली.
महाराजांचा पराक्रम याहुनी अगणित आहे
अगदी अंधाराची खोली न मोजता येणारा.
असे आज घडतेय का?
अन्याय होतोय आम्हावर  तोंड असूनही आम्ही गप्प  का?
मारणाऱ्याला मारता येतय  तरी हाथ थांबलेत का?
पळवणाऱ्यावर अंगावर धावताना  पाय थांबलेत  का?
समोरासमोर घडतेय पहाता येतय तरी डोळे बंद का?
श्वास कोंडतोय लोकशाहीचा तरीही नाक असे सुरु का?
सुखी जगतोय तरीही आपण पैशापायी विकले गेले का?
नक्की आपण हे का आणि  काय करतोय?
महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना ,
जाती-धर्माच्या आधारे  राजकारण करणाऱ्यांना,
मातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना,
भडकवून दंगली करून राजकारण करणाऱ्यांना,
बेताल वक्तव्य करून राजकारण करणाऱ्यांना,
भ्रष्टाचार  करून राजकारण करणाऱ्यांना,
अशा भ्रष्ट व्यक्तींना आपण प्रोत्साहन दिले आणि देतोय
पण हे सर्व असे का घडले?
कारण अन्याय होतांना पहातोय,
भ्रष्ट कारभारामुळे गेलेले बळी पहातोय,
तरी आम्ही गप्प का ? तर
कारण आमचे रक्त सुकलेय,आटलेय
कि हे एकमेकांवर खवळणारे रक्त मेलेय
याचाहि  निर्णय लागत नाही पण
एक मात्र नक्की माणुसकीचे रक्त मात्र बाटलेय .

एक छोटीशी चारोळी 
सोडा सर्व ते झेंडे या एकाच छत्राखाली,
आवाज त्यांचा पण हक्क मागुनी मिळेना ,
तुमच्यामुळे भ्रष्ट नेत्यांची घरेही भरली ,
शिवरायांना आज येथे मावळाच दिसेना..... (अर्थ समजून घेतल्यावर जरूर समजेल )



 शब्दरचना 
लेखक -अमोल ( भंडारा ) गायकर (सर्व हक्क सुरक्षित)
हे सर्व लिहिण्याचे कारण असे कि , आजपर्यंत जे घडले ते माझ्या लेखणीतून प्रसिद्ध करतोय.
विचार जरी माझे असतिल पण कृती मात्र तुमची पाहिजे.
जरूर आवडला तर किवा नाही तर कॉमेंट करा,शेअर करा आणि आमच्या बरोबर जोडून राहण्यासाठी अवश्य SUBSCRIBE करा .








No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...