Monday, May 18, 2020

रत्नागिरी पोलिसांनी केली ट्विटर भविष्यवाणी (वाचा संगमेश्वर टाईम्स चेसंपुर्ण बातमीपत्र)

रत्नागिरी पोलिसांनी ट्विट वर केली सादर बारा राशींचे भविष्यवाणी(संगमेश्वर टाईम्स)
रत्नागिरी(अमोल गायकर)- देशभरासहित महाराष्ट्र राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला असताना परजिल्ह्यातून येणाऱ्या कोकणातील नागरिकामधील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. यामुळे दिवस रात्र सेवा देणारे आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन यावरील ताण मात्र वाढला. काही ठिकाणी हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन सर्वसामान्य पाळताना दिसतात पण काही ठिकाणी तर काही नागरिक लपून छपून तर काही खुलेआम भ्रमण करताना दिसत आहेत.
     रत्नागिरी पोलिसांनी यावर बारा राशींचे भविष्य खालिल प्रमाणे ट्विटर ट्विट केले.निदान यावरून तरी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना शिकवण भेटेल.थोडक्यात काय याला भविष्य वाणी न म्हणता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि वेळेचे भान ठेवण्याचे आवाहन म्हणता येईल.
   👇👇👇👇

➡️ सर्व बारा राशींचे भविष्य:
अनावश्यक प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मास्क व Sanitizer वापरून शरीराला होणारी हानी कमी करावी. शासनाने ठरवून दिलेले नियम व अटींना सन्मान देऊन कोर्टकचेरीच्या फेर्‍या टाळता येतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या,घरी राहा सुरक्षित राहा.
रत्नागिरी पोलिस आणि आरोग्य यंत्रणा हे अहोरात्र जनतेच्या सेवेत आहे आम्ही संगमेश्वर टाईम्स संपादकीय मंडळ तर्फे त्यांचे आभार मानतो तसेच तुमच्यामुळे आम्ही मानवी दहशतवादी आणि जैविक दहशतवादी हल्यात सुरक्षित आहोत याबाबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
संगमेश्वर टाईम्स


Thursday, May 7, 2020

आठ जिल्हयांसाठी रत्नागिरीतून शुक्रवार पासून 25 एस.टी. सुटणार

प्रवाशांकडे प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक
रत्नागिरी | प्रतिनिधी 
लॉकडाऊन मध्ये जिल्हयात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजूरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्हयात पाठविण्याची तयारी पूर्ण झाली असून अशा सर्वांना उद्या शुक्रवार दि. 08 मे 2020 रोजी पासून जिल्हयातील विविध बसस्थानंकावरुन एस.टी. मार्फत जाता येणार आहे. अशा एकूण 25 बसेस उद्या जिल्हयातून निघतील असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद झाली व जिल्हयांच्या सिमा बंद झाल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढलेली आहे. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्हयात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे.
नागरिकांना यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
उद्यापासून जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदूर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्हयांना जाणाऱ्या बसेस सुटतील.
यात ज्यांच्याकडे अशा प्रवाशाची परवानगी आहे अशांनीच आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या 2 तास आधी पोहचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणी पत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकांने मास्क वापरणे बंधनकारक आहे.
या प्रवासासाठी गाडयांचे नियोजन आणि जिल्हयातील बसस्थानकातून गाडया सुटण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
संगमेश्वर टाईम्स
(सौजन्य/आभार दैनिक प्रहार डिजिटल)

Wednesday, May 6, 2020

जनतेचे रक्षक खाकी वर्दीसाठी माझा लेख समर्पित....

✍️ संगमेश्वर टाईम्स संपादकीय अग्रलेख 
(जनतेनी पोलिसांचा सुद्धा विचार करावा हे जाहिर आव्हान)

जनतेचे रक्षक खाकी वर्दीसाठी माझा लेख समर्पित....

(सदर छायाचित्र हे फक्त माहितीकरिता प्रसिद्ध करीत आहोत,कृपया गैरसमज करून घेऊ नये-संगमेश्वर टाईम्स)

     वाचकांसाठी अगोदर एक चारोळी सादर करीत आहे,

कोरोनाची भीती साध्या सर्दीमध्ये
पोलिस गस्त कोरोनाच्या गर्दीमध्ये
देवळात दिसेना देव आता
दिसतोय पांढऱ्या खाकी वर्दीमध्ये !!

      खरंच पोलिस सुद्धा माणूस च आहे ना , का त्यांना संसार नाही ,त्यांना घरे नाहीत का? जगभरासहित भारत देशात सुद्धा अक्षरशः कोरोनाने महाभयानक रूप धारण करीत थैमान घातले आहे.या कोरोनाने पूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. अशावेळी माणसांना कोरोनापासून वाचविणे च नाहीतर गुन्हेगारांपासून,दहशतवादी असू द्यात वा समाज कंटका पासून संरक्षण द्यायचे आहे ते काम उत्तम रित्या पार पाडण्याचे काम पोलिस करीत आहेत.आपण ज्यांना निवडून दिले ते लोकप्रतिनिधीमधील  20 टक्के काम करीत आहेत बाकी सर्व फुकट सोशल मीडियाचे नायक होताना दिसत आहेत. पण समाजातील खरे नायक आपण ज्यांना रिअल हिरो म्हणून संबोधू शकतो ते पोलिस. समाजातील काही समाज कंटकाना पोलिसाचे महत्व समजत नाही. काही दिवसांपूर्वी कुर्ला कमानी चा व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांवर काही समाजघातकी लोक दादागिरी दाखवित होते काही ठिकाणी तर पोलिसांवर हात उचलले  जात आहेत अशा समाज घातकी प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.
        चीनच्या वुहान शहरांतून आलेला हा कोरोना भारत देशासहित महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. अनेकांचे या कोरोनाने बळी घेतले तर मूठभर जीवांची सुटका झाली हा कोरोना एवढ्यावरच थांबला नाही तर देश लॉकडाऊन होई पर्यंत जनतेचे जीवन विस्कळीत होईपर्यंत पसरत जातोय. हा एक जैविक दहशतवादाचा भाग म्हणता येईल. या कोरोनाचा प्रसार कसा थांबवायचा ह्याचा विचार पडला आणि वैद्यकीय यंत्रणा धावली पण बाकीच्या समुदायाचे काय तेव्हा मात्र पोलिस यंत्रणा सज्ज झाली.कडवट असले तरी सत्य आहे मानवी दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलिस च आणि आता जैविक दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलिस च रक्षक म्हणून धाव घेतात. नाक्या नाक्यावर पोलिस , गावागावात पोलिस हि यंत्रणा ग्रामीण भागात मनुष्यबळ कमी असूनही 24- 36 तास काम करीत जनतेचे रक्षण करीत असल्याचे दिसून येत आहेत.स्वतःचे संसार सोडून पोलिस दुसऱ्याचा संसाराला सरंक्षण देत असल्याचे दिसत आहे. मनाला एक दृश्य मला चटका देऊन गेले माझें एक मित्र पोलिस खात्यात आहे त्याना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे पण संसार सोडून अहोरात्र फक्त ड्युटी चालू आहे त्यामुळे होणारे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसून गेले. काही पोलिस मित्रांनी तर स्वतःच्या कुटुंबाबद्दल डोळ्यात पाणी आणून खंत व्यक्त केली.पोलिस खात्यात महिला वर्ग ही आहे आपल्या लेकराबाळांना आणि कुटुंबाला सोडून त्याही अहोरात्र काम करताना दिसून येत आहेत.माझ्या पहाण्यामध्ये असणारे पोलिस ठाणे च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिला आहेत पण पुरुषाला हि लाजवेल असे कार्य ,लोकसेवा चालू आहे खरंच त्यांच्यामध्ये या रणरागिणी दुर्गेचे रूप जनहितार्थ लोकांसाठी ड्युटीवर दिसले. या कोरोना मध्ये जनतेची सेवा करीत असताना अनेक पोलिस खात्यातील व्यक्तींना कोरोना झाला काही तर मृत्यू मुखी गेले.या कोरोनामध्ये बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फिरत असताना मी या पोलिसांचे निरीक्षण केले त्यांना वेळेत जेवण नाही, अर्धवट जेवण करून ड्युटीवर पळावे लागते, झोप हि अपूर्ण मिळते, कोणाच्या चेहऱ्यावर ड्युटी करतेवेळी कुटुंबाची काळजी दिसून येते तर आठवणींची चमक दिसून येते. या कोरोनामध्ये ड्युटी करतेवेळी मी तर बाधित होणार नाही ना माझ्या कुटुंबाला काही त्रास होणार नाही अशी खंत / दुःख त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. भर उन्हात उभे राहून सेवा करावी लागते.हा सर्व त्रास होऊनही हि खाकी वर्दी जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असते एवढा त्रास घेऊन शेवटी त्यांना रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो ,ज्यावेळी पोलिस जनतेच्या सेवेत असतात तेव्हा काही काळे धंदे वाले आपले व्यवसाय चोरून करीत असतात अशावेळी जनतेनी त्यांना सहाय्य करणे गरजेचे आहे .प्रत्येक वेळी पोलिसांना दोष देण्यात काही व्यक्ती व्यस्त असताना दिसतात" दक्ष नागरिक " बनून आपण सुद्धा कर्तव्य बजावू शकता पोलिस यंत्रणेस मदत करू शकता.या कोरोनामध्ये कृपया शासन प्रशासनाने दिलेले नियम पाळणे आणि कायद्याचा आदर करणे हेच जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे.
     या कोरोनामध्ये आपले महाराष्ट्र पोलीस काय काम करतात याची जाणिव ठेवा..महाराष्ट्रा बाहेर जाणाऱ्यांची यादी बनवायचे काम पोलीसच करतात .रेशन चे दुकान असुद्या की दारूचे दुकान उघडले लोकांना डिस्टंस ठेवायला लावणे पोलिसच करतात ,कोरोना संशयित आढळून आला हाॅस्पीटला घेऊन जाणे पोलीसच करतात ,कोरोना संशयित मयत झाला स्मशानात घेऊन जायला पोलीस असतात ,कोरोना संशयित जागा सीलबंद करायला त्या जागी लोकांना फिरण्यास मनाई करण्यास पोलीस असतात  विनाकारण फिरणाऱ्यां वर कारवाई पण पोलीस करतात ,२४ तास चेक नाक्यावर नाकाबंदी पोलीस ठेवतात ,लॉकडाउन मध्ये कामावर जाण्यासाठी/काम चालू करण्यासाठी परवानगी देणे,VIP/VVIP आले की बंदोबस्त ठेवणे त्यांचे संरक्षण करणे पोलीस करतात,कोरोना बाधित लोकांची माहिती ठेवणे-पोलीसच ,आरोपी पकडणे,चोरी,मारामारी झाली की पोलीसच आठवतात,लोकांच्या घरातील भांडण असले तर पोलीस च मदत करतात,एखादा कोरोना रुग्णाने पलायन केले त्याचा शोध पोलिसच घेतात का तर समाजात प्रसार होऊ नये . या कोरोनाचा फायदा उचलून गुन्हेगारी नको वाढू दे यासाठी सुद्धा पोलीस पुढाकार घेतात.समाजात शांतता नांदू दे यासाठी पोलीस च महत्वाचे असतात.अशा अनेक अगणित रिअल हिरोचे काम पोलीस पूर्णपणे पार पाडण्यास समर्थ असतात .फक्त हे कर्तव्य करत असताना या कोरोनामध्ये कोणी पोलीस कर्मचारी पॉसिटीव्ह आले तर त्यांच्या पाठीशी उभे राहा कारण आजतागायत महाराष्ट्र राज्यात 300 च्या वर पोलिसांना कोरोना झालेला आणि काही मृत्युमुखी पडलेल्या घटना असतानाही हि खाकी वर्दी मागे हटताना दिसून येत नाही.पोलिस खात्याच्या ब्रीदवाक्या प्रमाणे " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " आपले पोलीस जनतेचे मित्र, रक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

।। जय हिंद ।।

जय हिंद म्हणून अवश्य कमेंट करा.....
      लेख आवडला तर नक्कीच प्रसिद्ध (share) करा
लेख लिहिण्याचे कारण एवढेच की हि एक तुफानी अचूक, बिनधास्त लेखक/संपादक अमोल गायकर यांच्या निर्भिड शोधक पत्रकारितेच्या लेखणीतून वास्तविक आणि सत्य मांडण्याचा आणि जनतेपर्यंत पोलीस या कोरोनाच्या जैविक दहशतवादी लढ्यात कसे मोलाचे कार्य करतात हे पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

शब्दांकन / लेखक 
अमोल (भंडारा) गायकर 
मोबा-8898545070
(संगमेश्वर टाईम्स MAHMUL 03679)
जनतेच्या न्यायहक्कांसाठी बुलंद आवाज
लढा अस्तित्वाचा, हा वारसा निर्भिड पत्रकारितेचा
www.sbsahyadri.blogspot.com

https://www.facebook.com/संगमेश्वर-टाईम्स-104349797630784/

Saturday, May 2, 2020

न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांचे करोनाने निधन

न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांचे करोनाने निधन
संगमेश्वर टाईम्स



नवी दिल्लीः लोकपाल सदस्य न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांचे शनिवारी करोना व्हायरसच्या संसर्गाने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ते छत्तीसगडचे माजी मुख्य न्यायमूर्ती होते. एम्समध्ये त्यांच्या उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. लोकपालचे प्रमुख असलेले न्यायमूर्ती पी. सी. घोष यांनी त्रिपाठिंच्या निधनावर शोक व्यक्त केला.

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्रिपाठींच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अजय कुमार त्रिपाठी हे पाटणा हायकोर्टाचे न्यायाधीश होते. छत्तीसगडमधील हायकोर्टाचे मुख्य न्यायमू्र्ती म्हणून त्यांनी काम केलं होतं, असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्या कुटुंबीयाचं ट्विटमधून सांत्वन केलंय.

न्यायमूर्ती त्रिपाठी हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. जवळपास तीन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली. एम्समधील कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. यादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांचे निधन झाले, अशी बातमी  महाराष्ट्र टाईम्स ने दिली.

भ्रष्टाचारविरोधी नेमलेल्या लोकपालमधील चार सदस्यांपैकी न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी हे एक सदस्य होते. लोकपालचे सदस्य म्हणून गेल्या वर्षी २३ मार्चला त्यांची नियुक्ती झाली होती.

पहा,IFSC संदर्भात देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलतात(संपुर्ण बातमीपत्र वाचा)

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत 
संगमेश्वर टाईम्स वर अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी Subscribe करा.




विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस -
 मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये अहवाल सादर केला. 
2014 पर्यंत तेव्हा ना महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे प्रस्ताव सादर केला ना केंद्राने त्याचा विचार केला.
2007 मध्ये व्हायब्रंट गुजरात समिटच्या वेळी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी अहमदाबादला आयएफएससी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनासाठी ईसीआयडीआयची नियुक्ती केली. 2012 पर्यंत गुजरात आयएफएससीचे सर्व आराखडे तयार झाले आणि कामालाही प्रारंभ झाला.
2015 मध्ये केंद्र सरकारने आयएफएससीसंदर्भात एसईझेडच्या कायद्यात केल्यानंतर गिफ्टसिटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याचवेळी मुंबईचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला. 
अहमदाबादचा प्रस्ताव बर्‍याच बाबींची पूर्तता करीत पुढे गेल्याने त्याला मंजुरी मिळाली आणि 50 हेक्टर जागेमुळे बीकेसीच्या प्रस्तावात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
त्यावरही सल्लागारामार्फत तोडगा शोधून पुन्हा हा प्रस्ताव फेरसादर करण्यात आला.
बुलेट ट्रेनचे स्टेशन बीकेसी येथे प्रस्तावित करताना केंद्र सरकारने बीकेसी येथे आयएफएससीचा विचार केला. आयएफएससीची इमारत नियोजित करूनच स्थानकाचा आराखडा तयार झाला.
दरम्यानच्या काळात गिफ्टसिटीमध्ये कामकाजाला प्रारंभ झालेला असल्याने तत्कालिन वित्तमंत्री अरूण जेटलीजी यांनी सांगितले की, दोन आयएफएससी एकत्रित काम करू शकतात का, ही बाब आमच्या विचाराधीन आहे. असे होऊ शकते, याबाबत महाराष्ट्र सरकारने अहवाल सादर केला आणि ही बाब अद्यापही विचाराधीन आहे.
डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केले आहे.
आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले. त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला.
आयएफएससीसाठी मुंबईचा दावा हा अतिशय नैसर्गिक आहे आणि महाराष्ट्र सरकारने ठरविले, तर निश्चितपणे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन होऊ शकते. 
Some people have a selective memory when they want to blame everything on Hon PM Narendra Modi ji’s Government !
High Power Committee of GOI submitted a report in February 2007 to create #IFSC in Mumbai.
Neither Govt of Maharashtra submitted an official proposal nor GOI considered it. 
In 2007, at Vibrant Gujarat Summit, the then Gujarat CM Hon Narendra Modi ji announced GIFT City Ahmedabad to be developed as IFSC and appointed ECADI for its planning. 
By 2012 all plans of #IFSC at Gujarat were ready and work had almost started.
In 2015, Govt of India enacted a law to govern IFSC & immediately Gift City proposal was submitted & eventually Mumbai’s proposal was also submitted.
GIFT city was in advanced stage so it got approval&Mumbai BKC proposal faced technical problem for want of 50 hectare contiguous land.
A solution was found to it & again a proposal was sent after appointing consultants & making all the plans.
The CentralGovt also took into account the #IFSCplans at BKC while planning the bullet train station & station is planned in such a way that IFSC building will come on it.
In the meantime GIFT city had already started functioning & the then FM Late Hon Arun Jaitely ji said that we are trying to see if 2 IFSCs can coexist.
GoM submitted a report on how they can coexist and that is still under consideration.
The headquarters is announced at Gandhinagar because as of now it is the only functional #IFSC. Those who are beating the chest now were in power from 2007 to 2014 & did nothing for Mumbai #IFSCand that void was captured by the then CM Hon Narendra Modi ji.
Mumbai has a natural IFSC ecosystem and it can still become IFSC if Maharashtra Government desires.
In December 2019 the Government of India enacted a law to create an Authority to regulate financial services center and its headquarters is now notified in Ahmedabad.


संगमेश्वर टाईम्स (संकलन)

Thursday, April 30, 2020

जय शिवराय,जय महाराष्ट्र (संगमेश्वर टाईम्स)

*महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतकाना शुभेच्छा*

सह्याद्रीसारखे उत्तुंगपण आणि समुद्रासारखी विशालता असलेले हे  महाराष्ट्र कोरोनाला सुद्धा नक्की हरवेल हाच विश्वास आहे. त्यासाठी सगळ्यांनीच सोशल डिस्टनसिंग पाळूया आणि महाराष्ट्रदिन साजरा करूया. धन्यवाद

.... संगमेश्वर टाईम्स संपादकीय मंडळ....
www.sbsahyadri.blogspot.com

Tuesday, April 28, 2020

गावठी जोमात आणि प्रशासन कोमात







प्रिय वाचकहो,
काही तांत्रिक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य बातम्या प्रसारित करण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व:  परंतु यापुढे असे न होता योग्य, खात्रीशीर बातमी वाचकांपर्यंत पोहचविणे आमचे कर्तव्य आहे. तांत्रिक आणि योग्य नेटवर्क च्या कारणांमुळे बातम्या पोस्ट होणे विलंब होत असल्याने पुन्हा एकदा क्षमस्व.....
      लवकरात लवकर आपल्या पर्यंत शोधक पत्रकारिता मधून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील बातम्या आपल्यापर्यंत पोहचण्याची आमची जबाबदारी पार पाडू.

सुप्रसिद्ध *संगमेश्वर टाईम्स* च्या आजपर्यंत 10,500+ इतके वाचक लाभलेले डिजिटल माध्यम  www.sbsahyadri.blogspot.com वर  वाचकांसाठी तुफानी संपादकीय अचूक बिनधास्त लेखणी मधील वास्तविक अग्रलेख

🔥🔥🔥🔥✍️🔥🔥🔥🔥
*गावठी जोमात आणि प्रशासन कोमात*

👆👆👆👆✍️👆👆👆👆

     (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नक्की कोणते धंदे चालू आहेत याचा गौफ्यस्फोट )
   वाचकांनी नक्की हा लेख वाचण्याचा लाभ घ्यावा.

आपला नम्र
अमोल गायकर
*संगमेश्वर टाईम्स DIGITAL*
www.sbsahyadri.blogspot.com

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...