संगमेश्वर तालुक्याकडे स्थानिक लोकसेवकांचा दुर्लक्षित कारभार
देवरुख - साखरपा मार्गावरील खड्डयांकडे कानाडोळा
संगमेश्वर(अमोल गायकर)- संगमेश्वर पासून देवरुख आणि देवरुख ते साखरपा या मार्गावर नेहमीची वर्दळ असते. शासकिय कार्यालय, बाजारपेठ आणि अनेक महत्त्वाच्या कामासाठी देवरुख शहर गजबजलेले असते.सदर मार्गावरून अनेक भाविक गणपतीपुळे,मार्लेश्वर या ठिकाणी मुंबईहुन तसेच अनेक ठिकाणाहून येत असतात.त्यांनाही या मार्गावरील पडलेल्या धोकादायक खड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो.यामुळे कोकणच्या पर्यटनावर फरक पडत आहे.स्थानिक आजी-माजी लोकसेवक या मार्गावरून जातात परंतु त्यांचाही आता संबंध संपला असा हावभाव असल्याचे भासते.
देवरुख बाजारपेठ म्हटले की,डोळयांसमोर संपूर्ण तालुका एकत्र आल्याचे चित्र दिसते. विविध भागांतील लोक या बाजारात येतात. याच बाजारपेठेच्या बाजूला "सप्तलिंगी" नदीच्या पुलावर खड्यात रस्ता की रस्त्यातील खड्डे आहेत हेच कळायला मार्ग नाही. अनेक जेष्ठ नागरिक तसेच अनेकांना या मार्गावरून प्रवास केल्यामुळे मणक्याच्या आजाराला आणि अंगदुखी ला बळी पडायला भाग पाडले आहे. याच्याच पुढे मैत्री पेट्रोल पंप ते मार्लेश्वर मार्गावर असंख्य मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातासारख्या घटना वाढल्या आहेत. या खड्डेमय मार्गामुळे होणाऱ्या जीवित हानी कोण जबाबदार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. देवरुख साखरपा मार्ग मुख्य असल्यामुळे दुसरा पर्याय नाही. या दयनीय अवस्थेला आम्ही चुकीचा लोकसेवक निवडला तसेच येणाऱ्या निवडणुकीला आमचा त्रास भरून काढू असे स्थानिकांनी मत व्यक्त केले.पालकमंत्री,खासदार ,आमदार यांचे संपूर्ण दुर्लक्षित कारभार आहे आणि सरकारी अधिकारी खुर्च्या सांभाळून ऐन पावसाच्या सुरवातीला कामे सुरू करतात.विकासासाठी प्राप्त होणारा निधी आणि त्याचा उपयोग योग्य रित्या न होता आपआपले खिसे भरण्यात आणि खुर्ची सांभाळण्यात गुंतलेले हे लोकसेवक आणि अधिकारी काय कामाचे? असा संताप स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या खड्डेमय रस्त्यांमुळे होण्याऱ्या जीवितहानी ला संपूर्ण जबाबदार हे लोकसेवक आणि अधिकारी आहेत. आपण आपले बहुमूल्य मत यांना देतो आणि निवडून आल्यावर हे लोकसेवक असूनसुद्धा विसरून जातात. अपघातामध्ये होणाऱ्या जीवितहानी ला यांना जबाबदार धरून यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
-भाई अमोल गायकर
देवरुख - साखरपा मार्गावरील खड्डयांकडे कानाडोळा
संगमेश्वर(अमोल गायकर)- संगमेश्वर पासून देवरुख आणि देवरुख ते साखरपा या मार्गावर नेहमीची वर्दळ असते. शासकिय कार्यालय, बाजारपेठ आणि अनेक महत्त्वाच्या कामासाठी देवरुख शहर गजबजलेले असते.सदर मार्गावरून अनेक भाविक गणपतीपुळे,मार्लेश्वर या ठिकाणी मुंबईहुन तसेच अनेक ठिकाणाहून येत असतात.त्यांनाही या मार्गावरील पडलेल्या धोकादायक खड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो.यामुळे कोकणच्या पर्यटनावर फरक पडत आहे.स्थानिक आजी-माजी लोकसेवक या मार्गावरून जातात परंतु त्यांचाही आता संबंध संपला असा हावभाव असल्याचे भासते.
देवरुख बाजारपेठ म्हटले की,डोळयांसमोर संपूर्ण तालुका एकत्र आल्याचे चित्र दिसते. विविध भागांतील लोक या बाजारात येतात. याच बाजारपेठेच्या बाजूला "सप्तलिंगी" नदीच्या पुलावर खड्यात रस्ता की रस्त्यातील खड्डे आहेत हेच कळायला मार्ग नाही. अनेक जेष्ठ नागरिक तसेच अनेकांना या मार्गावरून प्रवास केल्यामुळे मणक्याच्या आजाराला आणि अंगदुखी ला बळी पडायला भाग पाडले आहे. याच्याच पुढे मैत्री पेट्रोल पंप ते मार्लेश्वर मार्गावर असंख्य मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातासारख्या घटना वाढल्या आहेत. या खड्डेमय मार्गामुळे होणाऱ्या जीवित हानी कोण जबाबदार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. देवरुख साखरपा मार्ग मुख्य असल्यामुळे दुसरा पर्याय नाही. या दयनीय अवस्थेला आम्ही चुकीचा लोकसेवक निवडला तसेच येणाऱ्या निवडणुकीला आमचा त्रास भरून काढू असे स्थानिकांनी मत व्यक्त केले.पालकमंत्री,खासदार ,आमदार यांचे संपूर्ण दुर्लक्षित कारभार आहे आणि सरकारी अधिकारी खुर्च्या सांभाळून ऐन पावसाच्या सुरवातीला कामे सुरू करतात.विकासासाठी प्राप्त होणारा निधी आणि त्याचा उपयोग योग्य रित्या न होता आपआपले खिसे भरण्यात आणि खुर्ची सांभाळण्यात गुंतलेले हे लोकसेवक आणि अधिकारी काय कामाचे? असा संताप स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या खड्डेमय रस्त्यांमुळे होण्याऱ्या जीवितहानी ला संपूर्ण जबाबदार हे लोकसेवक आणि अधिकारी आहेत. आपण आपले बहुमूल्य मत यांना देतो आणि निवडून आल्यावर हे लोकसेवक असूनसुद्धा विसरून जातात. अपघातामध्ये होणाऱ्या जीवितहानी ला यांना जबाबदार धरून यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
-भाई अमोल गायकर
सामाजिक कार्यकर्ता
द ग्रुप
No comments:
Post a Comment