संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती
🔘संगमेश्वर टाईम्स🔘
🔹संगमेश्वर(हातीव)- महाराष्ट्र राज्यात तसेच पूर्ण भारत देशात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पहाता हा रोग संसर्गजन्य असून यांची साखळी तोडायची असल्यास या रविवारी 22 मार्च ला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत "जनता कर्फ्यु" पाळूया म्हणजे हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यु असेल जेणेकरून हि कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी सूचना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली. जनता कर्फ्यु साठी जनजागृती करणे महत्वाचे पाहून संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती केली.
▪️कोरोनाच्या विरोधात हा जनता कर्फ्यु महत्वाचा असून यामुळे नक्कीच या संसर्गजन्य रोगाची लागण थांबली जाईल. या कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करून हा " जनता कर्फ्यु" पाळणे हीच काळाची गरज आहे, असे मत श्री. कदम यांनी संगमेश्वर टाईम्स च्या प्रतिनिधी यांच्या समोर मांडले.
▪️कोरोनाच्या विरोधात हा जनता कर्फ्यु महत्वाचा असून यामुळे नक्कीच या संसर्गजन्य रोगाची लागण थांबली जाईल. या कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करून हा " जनता कर्फ्यु" पाळणे हीच काळाची गरज आहे, असे मत श्री. कदम यांनी संगमेश्वर टाईम्स च्या प्रतिनिधी यांच्या समोर मांडले.
संगमेश्वर टाईम्स
No comments:
Post a Comment