Monday, August 5, 2019

आज ३७० कलम हटले आणि काय रद्द झाले ते पहा (सावधान भारत : सह्याद्री नाऊ)


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घोषणा आज  राज्यसभेत केली. 

जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० मुळापासून काढून टाकून राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस अमित शहा यांनी संसदेत केली आणि आज दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ सोमवार रोजी मोदी सरकारने जम्मु काश्मीर मधून कलम ३७० / ३५ - अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयामुळे
 जम्मू काश्मीरचे विभाजन अर्थात  जम्मू काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाले त्याचप्रमाणे  लेह लडाख वेगळा झाला आणि हा  सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाले एवढेच नाहीतर वेगळा झेंडा,वेगळे सविंधान,ऱाज्याच्या नियंत्रणाखाली पोलीस,दुहेरी नागरिकत्व,विधानसभा कार्यकाळ ६ वर्षे,आरटिआय कायद्यावरील बंदी,बाहेरील व्यक्तीना संपत्ती विकत घेण्यास बंदी या सर्व गोष्टी रद्द झाल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...