Friday, August 2, 2019

रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. मिलिंदजी किर यांनी घेतली मा.निलेशजी राणे यांची भेट ......

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तसेच माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांची रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. मिलिंदजी किर यांनी सदिच्छा भेट घेतली...


     ➡ रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. मिलिंदजी कीर तसेच बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. राजेंद्रजी आयरे यांनी माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांची भेट घेऊन होणाऱ्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली त्यावेळी त्यांच्यासोबत राजन सूर्वे स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर शहराध्यक्ष संकेत चवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
       ▪श्री. मिलिंदजी कीर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकालामध्ये रत्नागिरी शहराच्या विकासासाठी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जे कार्य केले त्या सर्व कार्याची माजी खासदार श्री. निलेशजी राणे यांना कल्पना दिली. 
       ▪श्री. मिलिंदजी किर यांच्यासारखा सुशिक्षित, सुसंस्कृत,अभ्यासू आणि ज्याला नगरपालिकेच्या कामाची जाण आहे असा उमेदवार रत्नागिरी शहरातील जनतेला पाहिजे तसेच आज रत्नागिरी शहराला अशा नगराध्यक्षाची गरजही असल्याचे श्री. निलेशजी राणे यांनी सांगितले. 
       ▪श्री. निलेशजी राणे यांनी श्री. मिलिंदजी कीर यांना  सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्यामुळे आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पोटनिवडणुकीमध्ये नव्या जोषात शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे कळते.


आणि आमदार नितेश राणे यांच्या एका फोनवर आरटीओ कार्यालय शुद्धीत आले.....

बातमी थेट -कणकवली वरून दमदार आमदार मा.नितेशजी राणे जी यांची 

जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, समाजकल्याण सभापती यांच्या जुन्या गाड्या निर्लेखित करण्याची परवानगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात रखडली होती. हि परवानगी नसल्यामुळे जुन्या गाड्या वापरता येत नव्हत्या तर नवीन गाड्यांची प्रशासन खरेदीही करू शकत नव्हते. त्यामुळे जि.प. अध्यक्षांसह सभापतींची गैरसोय होत होती. याची माहिती जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना दिली. आमदार राणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना त्वरीत एक फोन करून तीनही वाहनां संदर्भात विचारणा केली. या वाहनांचा तपासणी अहवाल तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यास किती दिवस लागतील? याची विचारणा केली. आमदार राणे यांचा फोन होताच आरटीओ प्रशासन हडबडले आणि एका तासात तीनही वाहनांची झालेली झीज आणि ती वापरण्यास कशापद्धतीने अपात्र आहेत याचा वस्तुनिष्ठ अहवाल देऊन ही वाहने निर्लेखित करण्यास परवानगी दिली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या नाहरकत परवानगीने जिल्हा परिषदेच्या तीनही गाड्यांचा प्रश्न सुटला आहे. गेले कित्येक दिवस तपासणीच्या नावाखाली या गाड्या नेहमी सकाळी आरटीओ कार्यालयाच्या आवारात उभ्या करून ठेवल्या जात होत्या मात्र, त्या गाड्या वापरण्यास योग्य आहेत काय ? त्यांचे किलोमीटर प्रमाणे धाव संख्येचा निकष पूर्ण झाला आहे काय ? याबाबतचा अहवाल सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी तपशिलवार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. आणि त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांने हि वाहने निर्लेखित केली जाऊ शकतात कि नाही याचे नाहरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. मात्र, याच कामाला या कार्यालयाकडून होणाऱ्या विलंबामुळे अध्यक्ष सभापतींना जुन्या गाड्या वापरता येत नव्हत्या आणि प्रशासनाला नवीन गाड्या खरेदी करता येत नव्हत्या. या पत्रासाठी होणारा विलंब आमदार नितेश राणे यांच्या आरटीओंना केलेल्या एका फोनमुळे संपलेला आहे. त्वरीत निर्लेखनाची परवानगी मिळाल्याने प्रशासनस्तरावर कागदी घोडे कसे नाचविले जातात याचे उत्कृष्ठ उदाहरण पहावयास मिळाले आहे.
सौजन्य दैनिक प्रहार 

Thursday, August 1, 2019

Breking news (मा.निलेशजी राणे जी आणि मा.शेखरजी निकम ह्यांची भेट)


 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेशजी राणे यांनी शेखरजी निकम यांच्या निवासस्थानी भेट देवून सांत्वन केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखरजी निकम यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे.हे वृत्तानुसार गुरुवारी निकम कुटुंबियांचे सांत्वन करण्यास त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Ratnagiri, Sindhudurg Lok Sabha by former MP, Maharashtra pride leader Nileshji Rane comforted by visiting sekharaji Nikam's residence.


चेंबूर येथे पत्रकार, सामाजिक आणि राजकीय व्यक्तींकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
*जग बदल घालूनी घाव....*
*सांगुन गेले मज भीमराव....*
     *आपल्या लेखनीतून शोषित, पिडीतांच्या दु:खाला वाचा फोडून तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रहार करणारे, दीन दुबळ्यांचे कैवारी, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथिल संघटित पत्रकार कट्टा अर्थात जॉईंट जर्नलिस्ट ऍक्शन कमिटी येथे पेढे वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात नवनिर्माण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक आढाव, पत्रकार नंदू घोलप, पत्रकार लक्षांत  जाधव तसेच बहुजन संग्राम पत्रकार संघ कोकण प्रदेश आणि चेंबूर अध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युवक संगमेश्वर तालुका अध्यक्ष अमोल (भंडारा) गायकर त्याचप्रमाणे रिपाई(ए) चे मुंबई सचिव युवराज रामराजे आणि कार्यकर्ते सुनिल मंडा ,निलकंठ ओव्हाळे आणि अनेक सामाजिक आणि राजकिय मंडळी सामिल होते.

Tuesday, July 30, 2019

दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी

दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी 
दर पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि,यात्रा भरते त्याची हि कहाणी
(बिचारा भोळा – भाबड्या कार्यकर्त्याचे प्रश्न ,समर्थकाचा मोठेपणा ,दारुड्याची शुद्ध आणि त्यावरील उत्तरे ....)
कार्यकर्ता -या यात्रेत खेळणी भेटत्यात व्हय?
भंडारा - हो भेटतात ना हातात झेंडा घेऊन असतात जे तुटक्या पैशापायी, एक बाटली दारू साठी आणि बिर्याणी साठी येतात ना तीच खेळणी हो. लय भारी पण ही खेळणी मनोरंजन त्यांचे करतात , जाळपोळ आणि दंगल करून जेल मध्ये जातात, त्यांच्या एका हाकेवर रस्त्यावर उतरतात आणि आयुष्य बरबाद करून घेतात. 
(हे  ऐकून एक कट्टर समर्थक येतो आणि मध्येच बोलतो )
समर्थक -कायपण राव 2 तासासाठी एवढे कोण देतंय व्हय..मिळतंय तर घ्यायचे.मागच्या वेळी ८ दिवसांत २००० रुपये कमवून मस्त खाणे-पिणे होत.
भंडारा – अजून काय काय भेटतय ?लय भारी बुवा
समर्थक मागच्या वेळी साहेबांनी  आवाज दिला तिकडून आणि इकडे सर्व तोडफोड केली,आमच्यापैकी एक आता तर नगरसेवक हाय.काय ओळख एकदम भारी.साहेब नावाने ओळखतात मला बी.
भंडारा - भारी बुवा,तोडफोडी नंतर जेल झाली असेल सर्वांना ...
समर्थक - आठ दिवस  होतो आतमध्ये ....पण आम्हीच होतो ह्यो आताचा नगरसेवक नव्हता आत.
(तेवढ्यात एक बेवडा येवून मध्येच बोलतो )
दारुडा – ये ह्यो नगरसेवक तर आमच्या जीवावर झालाय ....म्हणून तर दारू पितोय मजा करा रे..
समर्थक – ये शहाण्या निघ नाहीतर अजून मार भेटल (दारुड्याच्या कानशिलात लगावून आणि दारुडा गेला)
समर्थक - आमच्या साहेबाला बोलतोय साला बेवडा कुठला ...पहिला चांगला होता चांगला शिकलाय पण , म्हणून दारू पितोय  हाहाहा ....
भंडारा – मस्त केलेत हो तो दारू पियालाय पण शुद्धीत बोलला आणि तुम्ही दारू न पिता शुद्धीत नाहीत.
समर्थक -हे सायबा जास्त बोलतोस काय केल मी ? साहेबाला बोलले आम्हाला खपणार नाही.
भंडारा - तुमच्या ह्याच विचाराने तुटलोय आम्ही, बिघडली आहेत भविष्य आमची  आणि नेत्यांची भाष्य सुद्धा,,आता तरी डोळे उघडणार का? लोकांमधून कार्यकर्ता निर्माण होतो,कार्यकर्त्यामुळे पक्ष बनतो,पक्षामुळे पक्षप्रमुख, आणि तुमच्या आमच्या मतदानामुळे हे नेते बनतात.हे आपले सेवक आहेत आणि आपण त्यांना साहेब ,भाई म्हणून त्यांच्या मागेमागे फिरतो.त्यांच्यासाठी आपण एकमेकांना मारतो.आवाज त्यांचा आणि जेल तुम्हाला.अरे जनतेसाठी रस्यांवर उतरणारा नेता पाहिजे नुसता आवाज दिला कि न्याय भेटत नाही.ते भडकवतात आणि आपण भडकतो .काय म्हणे तर साहेब बोलले.अरे तुमच्यामुळे तर साहेब निर्माण झाले. आपण भावनिक होतो आणि नको ते घडवतो . तुमच्यासारखे समर्थक तर या नेत्यांना राजा,साहेब आणि त्यांच्या  पत्नींना आईसाहेब ,मुलग्याला युवराज अशी संबोधतात .अक्कल गहाण ठेवलीय तुम्ही. जेव्हा या सह्याद्रीलाही आभाळाशी भिडताना पाहतो तेव्हा आठवते ते  सह्याद्रीच्या पायथ्याशी बलिदान झालेले रक्त, अरे पाण्यात सुद्धा इथली माती टाकली तरी त्या पाण्यावरचा तवंग सुद्धा आठवण करून देईल कोण राजा आणि युवराज.ज्यांच्या मुळे हि माती लाभली तीही आठवण करून देईल त्यांचा पराक्रम ,या सह्याद्रीच्या कडेकपारीतून ,किल्यांवर अजून गुंजतो तो एकच आवाज.विसरलात कसे इथे फक्त राजा म्हणून माझे शिवरायच,आईसाहेब म्हणून  माता जिजाई आणि युवराज माझे संभाजी राजे,आणि हो  साहेब तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर. आठवा त्यांची कार्य ,त्यांचा पराक्रम आणि बलिदानही .त्यांच्याच नावावरती करतात राजकारण,वेळ पडली तर दंगली हि.माझ्या महापुरुषांच्या उपमा  या  आताच्या नेत्यांना देता हि फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.इकडे अत्याचारा वर तर फक्त निषेध नोंदवला जातो माझ्या राजांच्या काळात तर  चौरंग केला जायचा.स्वराज्याशी गद्धारी केली म्हणजे आजचा भ्रष्टाचार,आणि भरपूर काही तर त्याचा  अनाजीपंत केला जायचा.साडेतीनशेहून जास्त वर्ष झाली तरी त्यांच्या इतिहासाला गालबोट लागले नव्हते आणि तशी हिमंत हि नव्हती . पण आतातर तुमच्या मुळे हे त्यांच्या नावावर राजकारण सुरु झाले तरी तुम्ही हातात वेगवेगळे झेंडे घेवून फिरा या भ्रष्ट नेत्यांच्या पाठीमागे.ज्यांनी तुम्हाला मोघलांपासून वाचवले ज्यांनी तुम्हांला गुलामगिरीतून बाहेर काढले ते याच साठी का ? तुम्ही परत त्याच गुलामगिरीत गेलात आता फक्त राज्यकर्ते बदललेत . अभ्यास शिकविला गेला कि , राजांनी गड जिंकले पण ते गड-किल्ले म्हणजे तुमची आमची आताची ठिकाणे हेही विसरता.कसे विसरू शकता युवराजांचे बलिदान आणि हे भ्रष्ट नेते त्यांच्याच नावावर राजकारण करतात ...... मघाशी त्या दारूडा आला तो खरे बोलला ,पण तुमची शुद्ध गेलीय,शिकून नोकऱ्यांच नाहीत फक्त बेरोजगारी ,निवडणूक आली कि मेघाभरती पण कसली पक्षात घेण्याची हेही तुम्हाला समजले नाही .नेता म्हटला कि जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा पाहिजे फक्त आवाज आणि आदेश देवून काय फायदा.जास्त काही बोलत नाही पण एक चारोळी सांगतो त्यावर नक्कीच अभ्यास करावा.
सत्तेसाठी तळवे चाटतीलहि हे परकीयांचे,
संसार उध्वस्त करतात हे स्वकीयांचे
कार्यकर्त्यांच्या मुळे  जीवन यांचे नेत्यांचे
गुलाम तुम्ही ,मरण मात्र आमचे.....
कार्यकर्ता बनायचे असल्यास प्रामणिक नेत्यासोबत जनहितार्थ  रहा.गुलामगिरीत कशाला राहता.अरे जगायचे तर वाघासारखे असे म्हणता आणि शेळी होवून जगता.षंड होण्यापेक्षा गुंड झालात तरी चालेल ,चुकीचे घडतेय तर जनहितार्थ बंड करावाच लागतो.अन्याय होतांना दिसतो २ दिवस सोशल मिडिया मार्फत निषेध आणि बलिदानावर श्रद्धांजली नोंदवायची आणि शांत बसायचे . काय झालेय सर्वांना?  तुमचे रक्त आटलय ,रक्त सुकलेय  कि मेलय ह्याचा काय सुगावा लागत नाही.पण एक मात्र नक्की रक्त माणुसकीच्या नावाचे  या राजकारणात बाटलेय.अन्याय,भ्रष्टाचार दिसतोय तरी शांत ,ज्यांना निवडून देता त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणिव सुद्धा करत जा ,तुमचा हक्क इथे मागून मिळत नाही तो मिळवायला लागतो इथे मागून मिळते ती फक्त भीक दर पाच वर्षांनी ह्याला गुलामगिरीच म्हणावी लागेल .मनुष्य जन्मी गुलामगिरीत तर आताची जनावरे सुद्धा राहत नाही.कधी कधी वाटते त्या नेत्यांसोबत तुमच्यासारख्याना सुद्धा कडेलोट करावा.हे बघा विचार माझे पण कृती मात्र तुमची असेल.
कार्यकर्ता  आणि समर्थक -  सायबा डोळे उघडले आमचे आम्ही यापुढे असेच होईल निडर जगणार.आणि जनहितार्थ कामे करून ह्यांना धडा शिकविणार
भंडारा - अजून एक सांगतो आणि निघतो मी
आजपर्यंत गुलामगिरीत जगलात
लोकशाहीचा घात हि तुम्हीच केलात
लेखणी घ्या तुमच्या विचारात
अन्यथा पडाल एक दिवस धूळखात .............

लेखक- भंडारा (अमोल गायकर )(सर्व हक्क सुरक्षित)
मोबा-८८९८५४५०७०

माझ्या प्रिय वाचकहो आवडला तर नक्की शेअर करा 

Thursday, May 30, 2019

‘मोदी सरकार-२’ : एका क्लिकवर मंत्र्यांची यादी


(या पोस्टवरील फोटो चा आणि माझ्या साईटचा काही संबंध नाही. फक्त उदाहरणाकरिता सदर फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फोटो च्या फोटोग्राफरचे खूप धन्यवाद)
राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २४ केंद्रीय मंत्री, ९ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत यांच्यासह २४ केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. जाणून घेऊयात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागली आहे.
नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
केंद्रीय मंत्री मंडळ (२४) –
– राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश)
– अमित शाह (गुजरात)
नितीन गडकरी (महाराष्ट्र)
– सदानंद गौडा (कर्नाटक)
– निर्मला सीतारमण (गुजरात)
– राम विलास पासवान (बिहार)
– नरेंद्र सिंग तोमर (मध्य प्रदेश)
– रवि शंकर प्रसाद (बिहार)
– हरसिमरत कौर बादल (पंजाब)
– डॉ. थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश)
– एस. जयशंकर (बिहार)
– रमेश पोखरियाल निशांक (उत्तराखंड)
– अर्जुन मुंडा (झारखंड)
– स्मृती इराणी (उत्तर प्रदेश)
– डॉ. हर्षवर्धन (दिल्ली)
प्रकाश जावडेकर(महाराष्ट्र)
– पियुष गोयल (महाराष्ट्र)
– धर्मेद्र प्रधान (ओडिसा )
– मुख्तार अब्बास नक्वी (उत्तर प्रदेश)
– प्रल्हाद जोशी (कर्नाटक)
– डॉ. महेंद्रनाथ पांडेय (उत्तर प्रदेश)
डॉ. अरविंद सावंत (महाराष्ट्र)
– गिरिराज सिंह (बिहार)
– गजेंद्रसिंह शेखावत (राजस्थान)
राज्यमंत्री (स्वतंत्र्य कारभार) खालील प्रमाणे (९) –
संतोषकुमार गंगवार (उत्तर प्रदेश)
– राव इंद्रजित सिंह (हरियाणा)
– श्रीपाद नाईक ( गोवा)
– डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू-काश्मीर)
– किरण रिजीजू (अरुणाचल प्रदेश)
– प्रल्हाद पटेल (मध्य प्रदेश)
– आर. के. सिंह (बिहार)
– हरदीपसिंग पुरी (पंजाब)
– मनसुख मांडवीय (गुजरात)
राज्यमंत्री (२४) –
– फग्गनसिंग कुलस्ते (मध्य प्रदेश)
– अश्विनीकुमार चौबे (बिहार)
– अर्जुनराम मेघवाल (राजस्थान)
– व्ही के सिंह (उत्तर प्रदेश)
– कृष्णपाल गुर्जर (हरियाणा)
रावसाहेब दानवे (महाराष्ट्र)
– डी किशन रेड्डी (तेलंगणा)
– पुरुषोत्तम रूपाला (गुजरात)
रामदास आठवले (महाराष्ट्र)
– साध्वी निरंजन ज्योती (उत्तर प्रदेश)
– बाबूल सुप्रिओ (पश्चिम बंगाल)
– संजीव बालियाना (उत्तर प्रदेश)
– संजय धोत्रे (महाराष्ट्र)
– अनुराग ठाकूर (हिमाच प्रदेश)
– सुरेश अंगडी (कर्नाटक)
– नित्यानंद राय (बिहार)
– रतनलाल कटारिया (हरियाणा)
– व्ही मुरलीधरन (केरळ)
– रेणुका सिंह (छत्तीसगढ)
– सोमप्रकाश (पंजाब)
– रामेश्वर तेली (आसाम)
– प्रतापचंद्र सारंगी (ओदिशा)
– कैलाश चौधरी (राजस्थान)
– देबश्री चौधरी (पश्चिम बंगाल)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होणार का? तुमचे मत सांगा.या साईट वर कॉमेंट करा.

ब्रेकिंग न्यूज/Breaking news
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरदजी पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी दिल्लीत झाली भेट.
तब्बल 25 ते 30 मिनिटे झाली चर्चा.
येत्या विधानसभा बद्दल झाली चर्चा.
पवारांच्या भेटीनंतर राहुल भेटणार डॉ. मनमोहन सिंग यांना भेटणार.
काँग्रेस कडे 52 खासदार तर राष्ट्रवादी कडे 5 खासदार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...